KHABARNAMA

.
Latest Post


गंगापूर प्रतिनिधी । विजय बन्सोड

गावपातळीवर प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या निवड प्रक्रियेत बाबरगाव येथील ग्रामसभेत अरूण हरींचंद्र पठाडे यांची गावकऱ्यांनी बिनविरोध निवड केली या प्रसंगी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामविकास अधिकारी एस टी चोथे सरपंच शोभाताई दत्तू लिंबोरे  सुनंदा कृष्णा दंडे सुरेश दंडे शिवाजी सावंत राजू सावंत प्रदीप सावंत राजाभाऊ दंडे हरिभाऊ सावंत महेश सावंत फुलचंद सागर अनिल दंडे पांडुरंग दंडे नामदेव दंडे विजय दंडे चांगदेव दंडे कांताराव दंडे पांडुरंग सावंत कल्याण पठाडे  दीपक पठाडे अप्पासाहेब पठाडे भास्कर पठाडे माणिकलाल डांगर कुमार काका संदीप शेजुळ कल्याण सावंत बाबासाहेब तुपे रमेश तुपे शंकर तुपे आदी उपस्थित होते

प्रतिक्रिया : आपण गावातील सर्वांना सोबत घेऊन गावात नेहमीच सलोख्याने राहील या कडे विशेष लक्ष देऊन गावातील तंटे गावातच सामोपचाराने मिटवून गावासाठी दुसरा तंटामुक्ती पुरस्कार मिळण्यासाठी प्रयत्न करणार. अरुण पठाडे


चांदेकसारे (वार्ताहर )
मुलांना पुस्तकी ज्ञानासोबत दैनंदिन व्यवहारातील आर्थिक -देवाण घेवाण या विषयी ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी बालआनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहीती शालेय समिती व्यवस्थापन समिती अध्यक्ष डाँ सुनिल होन यांनी चांदेकसारे येथे जिल्हापरीषद परीषद मराठी शाळेत बालआनंद मेळाव्याचे आयोजन घेण्यात आला यावेळी बोलताना केले . अध्यक्षस्थानी सुधीर जावळे होते 
   ,विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी भेंडी.डांगर टोमॅटो .मेथी बटाटे उपवासाची पदार्थ पाववडे भजी वेफर्स विक्रीसाठी आणली पालकांनी पैसेदेऊन खरेदी केली यामध्ये अंदाजे  पाचहचार रु उलाढाल झाली. पालकांचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद होता यावेळी शाळाव्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते.
बालआनंद मेळावा यशस्वी करण्यासाठी सिताराम गुरसळ वाल्मिक खंडीझोड  विलास शिंदे राजेंद्र पोटे किरण गायकवाड गायञी बुरकुले आदि शिक्षकांनी विशेष परीश्रम घेतले प्रास्तविक राजेंद्र पोटे यांनी केले सुञसंचलन सिताराम गुरसळ यांनी केले वाल्मिक खंडीझोड यांनी आभार मानले.

बोधेगाव वार्ताहर  
पिंगेवाडी सहकारी सेवा संस्थेच्या अध्यक्ष पदी उदय मुंडे तर उपाध्यक्षपदी केशव अंगरक यांची बिनविरोध निवड झाली आहे 
        शेवगाव पूर्व भागातील राजकीय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पिंगेवाडी सहकारी सेवा संस्थेवर भाजपाचे अरुण मुंडे यांचे वर्चस्व असून संस्थेचे विद्यमान अध्यक्ष अनिल तानवडे उपाध्यक्ष भगवान मुंडे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदाच्या निवडीसाठी आज संचालक मंडळाची बैठक बोलविण्यात आली अध्यक्ष पदासाठी उदय भाऊसाहेब मुंडे तर उपाध्यक्ष पदासाठी केशव  गोपाळा अंगरख यांचे एकमेव अर्ज दाखल  झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी लोखंडे, विखे, यांनी वरील दोघांची  बिनविरोध निवड जाहीर  करण्यात आली त्यानंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला 
        यावेळी सरपंच रविंद्र तानवडे, अनिल तानवडे, विठ्ठल मुंडे, आश्रू नागरे, मुसा शेख, बबन वाघ, रामा जायभाये, आदी ग्रामस्थ उपस्थित होते नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन होत आहे संस्थेचे सचिव संजय गर्जे यांनी आभार मानले 

नेवासा, प्रतिनिधी
नेवासा शहरातील मुख्य रस्त्यावर बसणाऱ्या फळ विक्रेत्यांना पर्यायी जागेची व्यवस्था करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नेवासकर ग्रामस्थांनी नगर पंचायत प्रशासनाला निवेदनाद्वारे केली आहे.नेवासा नगरपंचायतचे नगराध्यक्ष यांच्यासह  उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील व  नगरपंचायतच्या प्रशासकिय अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे.

याबाबत नगरपंचायतला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नगरपंचायत समोरील चौकात रस्त्याला अडथळा निर्माण होईल अशा पध्दतीने फळ विक्रेत्यांनी दुकाने लावलेली आहे त्यातच मोकाट असलेली जनावरे ही देखील वाहतुकीस अडथळा निर्माण करत असल्याने अनेक दुचाकी चालक हे जखमी होऊन पडले आहे यामुळे रस्त्यावर वाहतुकीला अडथळा करणाऱ्याचा बंदोबस्त करण्यात येऊन हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा अन्यथा याबाबत नेवासकर नागरिक त्रिव आंदोलन करतील असा ईशारा निवेदनात देण्यात आला आहे.
        नगरपंचायतला दिलेल्या निवेदन उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील तसेच नगरसेवक व प्रशासकीय अधिकारी यांना देण्यात आले.यावेळीं नगरसेवक अंबादास इरले,भारत डोकडे,राजेंद्र मापारी,नगरपंचायतचे कर्मचारी विलास आरले उपस्थित होते.या निवेदनावर बालेंद्र पोतदार,सामाजिक कार्यकर्ते शिवा राजगिरे,अनिल सोनवणे,संजय व्यवहारे,अमृत फिरोदिया, शकील शेख, फारूक शेख,शंकर तंटक,दीपक परदेशी,महेश शेजुळ,
सचिन बोरुडे,गणेश निंबाळकर,अक्षय अंबिलवादे,शंकर तनपुरे,गौरव चानन,सुभाष पाटील कडू,विनायक ताठे यांच्यासह शेकडो ग्रामस्थांच्या सहया आहेत.

नेवासा, प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम टोका येथील शेतकरी व माजी सरपंच गजानन जनार्धन चव्हाण यांना भारतीय लहुजी सेनेच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय प्रगतशील शेतकरी पुरस्कार श्रीरामपूर येथे झालेल्या कार्यक्रमात महंत बालब्रह्मचारी महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
        प्रवरासंगम टोका येथील माजी सरपंच गजानन चव्हाण यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीवर विविध प्रयोग राबवून एक आदर्शवत शेती केली ती इतर शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण केल्याने त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला
        पुरस्कार प्रदान करतेवेळी भारतीय लहुजी सेनेचे संस्थापक विजय रेड्डी,राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल सचिव हनिफभाई पठाण,प्रगतशील शेतकरी पोपटराव पाटील,माजी शिक्षण संचालक रामचंद्र जाधव,शांतवन खंडागळे,कायदेशीर सल्लागार अँड रमेश कोळेकर, जिल्हा उपाध्यक्ष रज्जाकभाई शेख,कार्याध्यक्ष शांतवन खंडागळे उपस्थित होते.
   राज्यस्तरीय प्रगतशील शेतकरी पुरस्कार मिळाल्याबद्दल गजानन चव्हाण यांचे प्रवरासंगमचे सरपंच सुनील बाकलीवाल,सोसायटीचे माजी अध्यक्ष व प्रगतशील शेतकरी पोपटराव पाटील मुळा कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील,राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, राष्ट्रीय सचिव हनिफभाई पठाण, कायदेशीर सल्लागार अँड रमेश कोळेकर जिल्हा कार्याध्यक्ष शांतवन खंडागळे, जिल्हा उपाध्यक्ष रज्जाकभाई शेख यांनी अभिनंदन केले आहे.

आरोपींना मिळालेल्या शिक्षेची अंमलबजावणी जलदगतीने व्हावी-पदमभूषण अॅड. उज्वल निकम


नेवासा, प्रतिनिधी
गुन्हेगारांचे कर्दनकाळ अशी ओळख असलेल्या राज्याचे प्रसिद्ध सरकारी वकील पदमभूषण अॅड.उज्वल निकम यांनी आपले मित्र असलेल्या नेवासा येथील जेष्ठ विधी तज्ञ अँड.एम.आय.पठाण यांच्या निवासस्थानी भेट सदिच्छा भेट दिली. तत्परतेने न्याय मिळावा अशीच सर्वसामान्य माणसांची ईच्छा असल्याने अशी प्रक्रिया होणे गरजेचे आरोपींना मिळालेल्या शिक्षेची अंमलबजावणी जलद व्हावी अशी अपेक्षा ही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
यावेळी सदिच्छा भेटीप्रसंगी जेष्ठ विधी तज्ञ अॅड.एम.आय.पठाण यांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी नेवासा पोलीस स्टेशनचे निरीक्षक रणजित डेरे साहेब यांच्यासमवेत अहमदनगर येथील निकम साहेब यांचे जुनियर वकील अॅड.वकील फडे व त्याचे सहकारी हजर होते यावेळी पठाण परिवाराच्या वतीने अॅड.उज्वल निकम यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अॅड.उज्वल निकम यांनी चालू घडामोडीवर चर्चा केली महिला अत्याचाराच्या बाबत न्याय निवाडा तत्परतेने होणे गरजेचे असून महिला अत्याचारातील आरोपींना मिळालेल्या शिक्षेची अंमलबजावणी जलदगतीने होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी बोलताना केले.पठाण यांच्या परिवारातील सदस्यांशी त्यांनी यावेळी हसतमुखाने संवाद साधला व स्नेहभोजन घेतले.
यावेळी नेवासा येथील जेष्ठ विधीतज्ञ अॅड.एम.आय. पठाण,यांच्या समवेत नेवासा पोलीस स्टेशनच्या शांतता व जातीय सलोखा कमिटी सदस्य आसिफभाई पठाण, अॅड.जफरखान पठाण,अॅड.मोजमखान पठाण, अॅड. अय्याजखान पठाण,अॅड.खलीलखान पठाण. अॅड. मुजाहीडखान पठाण,राजूभाई पठाण उपस्थित होते.

न्यायालयाने सरकारला ठोठावला २५ हजाराचा दंड ! 

नेवासा, प्रतिनिधी
झाडाझडती घेतल्या प्रकरणी नेवासा पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरोधात अर्जदार यांनी शासनाची परवानगी घेऊन गुन्हे दाखल करावे असे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने दिले आहे.
याबाबत औरंगाबाद हायकोर्टाचे वकील अॅड संदीप सपकाळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की दि.६ मे २०१८ रोजी याचिकाकर्ते ज्ञानेश्वर तोडमल (माऊली)हे परिवारासोबत घरामध्ये झोपलेले असतांना नेवासा पोलीस स्टेशन येथील पी.आय.लोखंडे व कॉन्स्टेबल विठ्ठल गायकवाड व इतर दहा ते बारा पोलीस
कर्मचारी हे सोबत कुठल्याही प्रकारचे वॉरंट नसतांना अर्जदार ज्ञानेश्वर तोडमल यांचे घरामध्ये बेकायदेशीर रित्या घुसून घर झडती घेतली होती,सदरील घेतलेल्या घर झडती बाबत अर्जदार ज्ञानेश्वर तोडमल यांनी अॅड विजय सपकाळ व अॅड संदीप सपकाळ यांच्या मार्फत उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे नेवासा पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक लोखंडे व पोलिस कॉन्स्टेबल विठ्ठल गायकवाड व इतर दहा ते बारा पोलिस कर्मचारी यांच्या विरोधात रीट याचिका दाखल केली होती.
सदरील रिट याचिकेच्या सुनावणी दरम्यान याचिकाकर्ते यांच्या वकीला मार्फत युक्तिवाद करण्यात आला की घरझडती वॉरंट नसतांना पोलीसांनी घेतलेली घरझडती ही बेकायदेशीर असून ही अर्जदार यांच्या वैयक्तिक अधिकारावरती घाला घालणारी आहे.सदरील कृत्य हे भारतीय राज्यघटनेमधील कलम २१ चे उल्लंघन करणारे आहे,तसेच सीआरपी कलम १६५,१६६ चे उल्लंघन करणारे आहेत. तसेच अर्जदार यांचे वकिलांनी असा युक्तिवाद केला की घरझडती घेते वेळेस पोलिस कॉन्स्टेबल विठ्ठल गायकवाड यांनी अर्जदार यांना खोट्या गुन्हयामध्ये फसविण्याची धमकी सुद्धा दिली. सदरील कृत्य हे पोलीस कर्मचारी यांना दिलेल्या अधिकाराचे उल्लंघन करणारे आहे व पोलीस खात्यास काळिमा फासण्यासारखे कृत्य आहे.उच्च न्यायालयाने सरकार पक्ष व अर्जदार यांचा युक्तिवाद ऐकूण घेऊन असे स्पष्ट केले की अर्जदार यांच्या वैयक्तिक अधिकारावर घाला  घालणारी आहे.तसेच पोलिसांकडून घेण्यात आलेल्या बेकायदेशीर घरझडतीमुळे उच्च न्यायालयाने  महाराष्ट्र सरकार यांच्यावरती पंचवीस हजार रुपयांचा दंड ठोकला आहे.
तसेच उच्चन्यायालयाने सदरील दंड हा पोलीस अधिकाऱ्यांकडून वसूल करण्याचे आदेशात केला आहे 
तसेच न्यायालयाने अर्जदार यास सदरील पोलीस कर्मचाऱ्या विरोधात शासनाची परवानगी घेऊन फौजदारी गुन्हे दाखल करण्यास परवानगी दिली आहे.उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे पोलीस खात्याला विना वॉरंट घरझडती घेणे या कृत्यावरती चांगलीच टाच बसणार आहे.सदरील प्रकरणी अर्जदार यांच्या तर्फे अॅड विजय सपकाळ व अॅड संदीप सपकाळ यांनी काम पाहिले व सरकार पक्षातर्फे अॅड.डी. आर.काळे यांनी काम पाहिले.

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget