सोनई गावाला १७ दिवसांपासून पिण्याच पाणीच नाही !

माजी खासदार तुकाराम गडाख युवा मंचचा आंदोलनाचा इशारा !

नेवासा, प्रतिनिधी
सोनई गावाला गेल्या सतरा दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब झाली रस्ते, पथदिवे या मुलभूत सुविधा तर लांबच राहिल्या. साधं पिण्याचं पाणीही पुरवू न शकणार्‍या निष्क्रिय सोनई ग्रामपंचायत प्रशासनाला येथील जागरुक तरुणांनी नुकतंच  निवेदन दिलं. माजी खा. तुकाराम गडाख युवा मंचने यासाठी पुढाकार घेतला.
  माजी आ. मुरकुटेंचा पराभव करुन नेवाशाचे लोकप्रतिनिधी झालेल्या आ. शंकरराव गडाख यांच्या ताब्यात ही ग्रामपंचायत आहे. विशेष म्हणजे  सोनईसह अठरा गाव पाणी योजने संदर्भात अहमदनगरच्या तारकपूर परिसरातल्या जीवन प्राधिकरण विरोधात आक्रमक पवित्रा घेत आ. गडाखांनी आंदोलही केलं होतं. या आंदोलनानंतर सदर पाणी योजना सुरळीत सुरु देखील झाल्याचा दावा आ. गडाख समर्थकांमधून करण्यात आला. मात्र तरी ही तब्बल सतरा दिवसांपासून सोनई गांव तहानलेलं आहे. ग्रामस्थ विकत पाणी घेऊन कशी तरी तहान भागवत आहेत. तीन दिवसात पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविली नाहीतर कुठल्याही क्षणी तिव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. गेली अनेक वर्षे आमदार, खासदार देणार्‍या गावाला पाणीच मिळत नसेल तर गांवचा काय विकास होणार ? असा सवाल अॅड. प्रफूल्ल जाधव यांनी बोलतांना उपस्थित केला. यावेळी युवा नेते अमोल चव्हाण, प्रमोद कुमावत आदी उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget