नेवासा, प्रतिनिधी
महाशिव आघाडीचे सरकार स्थापण होण्यासाठी १५ - २० दिवसांचा कालावधी लोटला गेला वेगवेगळ्या राजकिय चमत्कार घडले.अखेर पुन्हा सरकार स्थापण होण्याचा मार्ग निघाल्याने नेवासाफाटा येथील क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे युवानेते ज्ञानेश सिन्नकर व पदाधिकाऱ्यांनी फटाके वाजवून जल्लोष व्यक्त केला.
महाशिव आघाडीचे सरकार स्थापण होण्यासाठी अनेक विघ्न आलेले होते अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेचे सर्वासर्वे शरद पवार कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आलेल्या संकंटावर यशस्वी मात करुन सरकार स्थापण करण्याचा मार्ग सुकर केला आसल्याने १५ - २० दिवस चाललेला पाठशिवनीचा खेळ संपुष्ठात येवून सरकार स्थापण होण्याचा मार्ग यशस्वी झाल्याने क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्यावतीने आंबेडकर चौकात फटाके फोडून जल्लोष साजरा केला या प्रसंगी ज्ञानेश सिन्नरकर,दिनेश सरगय्ये,अरिफ पठाण,जब्बार शेख.राजेंद्र गोसावी,शंकर दाणे आदी उपस्थित होते.
स्वतंञ नेवासा विधानसभा मतदार संघाचे आमदार शंकरराव गडाख विजयी होण्यासाठी ज्ञानेश सिन्नकर यांनी तुळजापूरला जावून नवस पुर्ती करुन त्यांना मंञीपद मिळण्यासाठी साकडे घातले होते.आणि साहेबांना मंञीपद मिळाल्यानंतर पुन्हा तुळजापूरला जावून आई तुळजाभवानीच्या चरणी लिन होणार आसल्याचे सिन्नरकर यांनी सांगितले.शंकरराव गडाख यांनी शिवसेनेला पाठींबा दिलेला होता.माञ सत्ता स्थापण होण्यासाठी महाशिव आघाडीला अनेक संकटांचा सामना करावा लागला अखेर मार्ग यशस्वी झाल्यानी त्यांनी फटाके फोडत जल्लोष व्यक्त केला.

إرسال تعليق