नेवासा,(प्रतिनिधी)
दिपावली म्हणजे जिववातील अंधार दुर करुन उजेडाला सामोरे जाण्याचा सण दिपोत्सव तेजोमय अन् प्रकाशमय करण्यासाठी घरासमोरील अंगणात लखलखत्या पत्यांनी नटलेला हा सण मानला जातो ग्रामिण भागात मातीच्या पंत्यामध्ये तेल ओतून पंत्या पेटविल्या जातात माञ यंदा परतीच्या पावसामुळे सलग चालू आसलेल्या पावसामुळे पंत्याविना दिपावली साजरी करण्याची वेळ ग्रामिण भागावर येवून ठेपली आहे.
शहरी भागात डिजीटल युग आसल्यामुळे विद्युत वाहीनीतूनही पणत्या लावल्या जातात माञ ग्रामिण भागात आजही मातीच्या पणत्यांमध्ये गोडतेल टाकून दिपावलीच्या दोन - तीन दिवस आधी व दोन - तीन दिवस नंतर हा दिनक्रम चालू आसतो.माञ पाऊलामुळे पणत्या विना दिपावली साजरी करण्याची वेळ परतीच्या पाऊसामुळे ग्रामिण भागात आली आसल्याचे वास्तव यंदाच्या पाऊसामुळे आलेली आहे.

Post a Comment