नेवासा(प्रतिनिधी)
भगवंताच्या नामचिंतनात आलेल्या संकटाला परतवून लावण्याची ताकद असल्याचे प्रतिपादन हभप पांडुरंग महाराज गिरी वावीकर यांनी केले ते सदगुरू नारायणगिरी महाराज यांच्या प्राणप्रतिष्ठापणा निमित्ताने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहातील कीर्तन महोत्सवाचे पाचवे पुष्प गुंफतांना केले.
नेवासा बुद्रुक शिवारातील सुरेगाव रस्त्यावर असलेल्या सदगुरू नारायणगिरी महाराज प्रबोधन प्रतिष्ठान प्रांगणात सदगुरू नारायणगिरी महाराजांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा सोहळयाच्या निमित्ताने आयोजित अखंड
हरिनाम सप्ताहातील पाचवे पुष्प गुंफतांना हभप पांडुरंग महाराज गिरी हे बोलत होते.
यावेळी बोलताना पांडुरंग महाराज गिरी म्हणाले की मनुष्य जीवन परतंत्र व प्रारब्धाच्या हातात आहे,आतापर्यंत जीवनात सर्वकाही घडले ते इच्छेनुसार घडले का याचा विचार करा,मनासारखं घडत नाही पण जीवनात घडत ते आनंदाने मानणे व स्वीकारणे याच्यातच समाधान मानले पाहिजे, प्रत्येकाचे जीवन हे कर्माप्रमाणे चालत असते,सुख व दुःख हे कर्मानुरूप येणारे दोन पाहुणे आहे,सुख आले तर हुरळून जाऊ नका दुःख आले तर शोक करू नका दुःखाला घाबरू नका दुःखाचा भार भगवंताकडे द्या त्याचे नामचिंतन करा संकटाचे निश्चितच निवारण होईल असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
यावेळी सोहळा संयोजक गुरुवर्य उध्दव महाराज मंडलिक यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. भागवतराव निमसे यांच्या हस्ते संतपूजन करण्यात आले.यावेळी गायनाचार्य प्रकाश महाराज कातकडे, किशोर महाराज शेळके,बाळासाहेब मगर,कैलासराव पवार,युवराज महाराज देशमुख,रामनाथ महाराज पवार, सागर महाराज आधाने,कृष्णा महाराज मते, शंकरराव लोखंडे,पुणे येथील उद्योजक रविंद्र मुनोत, जयप्रकाश रासने,संत सेवक रखमाजी नाचन, रामनाथ नन्नवरे,सुदाम मंडलिक,सोमनाथ वाखुरे,लक्ष्मण महाराज नांगरे यांच्यासह भाविक मोठया संख्येने उपस्थित होते उपस्थित भाविकांना आमटी भाकरीचा महाप्रसाद वाटण्यात आला.

Post a Comment