नेवासा तालूक्यात ओला दुष्काळ ! शेतात पाणीच पाणी बळीराजा संकटात !

नेवासा, ( प्रतिनिधी)
निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी शेतकरी दुष्काळात होरपळतो तर कधी एखाद्या वेळेस शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाला सामोरे जाण्याची वेळ येते बळीराजाला निसर्गाच्या तडाख्याच्या संकटाला सामोरे जाण्याची वेळ येत आसल्याने निसर्ग शेतकऱ्यांचा पिच्छा सोडायला तयार नसल्याने यंदा नेवासा तालूका ओल्या दुष्काळाने ओलाचिंब न्हावून निघाला आहे शेतकऱ्यांची उभी पिकांची नासाडी झाली आहे.
  तालूक्यात शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांत पाणी साचल्याने पिके सडण्याची वेळ आली आसून ओला दुष्काळामुळे शेतकऱ्यावर संकट कोसळले आहे. कधी वरुणराजा शेतकऱ्यांना हुलकावणी देत आसल्याने पाण्या अभावी पिके वाळून जातात. तर एखाद्या वेळेस ओला दुष्काळ पडल्याने पिकांची नासाडी होते.निसर्ग शेतकऱ्यांचा पिच्छाच सोडायला तयार नसल्याने बळीराजा निसर्गाच्या लहरी कारभाराला कंटाळला आहे.बाजरी,मका,कापशीची प्रचंड नुकसान झाले आसून उत्तर नगर जिल्ह्याचे शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांनी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे व घराच्या पडझडीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आसून ओला दुष्काळ पडून शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आसले तरी आता पाण्याचा प्रश्न सुटला आसल्याने शेतकऱ्यांत 'कभीं गम कहीं खुशी'चे वातावरण बळीराजाच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget