स्वपक्षातील विखे पाटलांनी पाठीत खंजीर खुपसल्याची कार्यकर्त्यांत चर्चा !

घड्याळात बँटरी शिल्लक न ठेवण्याची वल्गना फेल ! पराभूत आमदार विखेंवर फोडताहेत खापर ?


नेवासा,(प्रतिनिधी)
अहमदनगर जिल्ह्यात घड्याळात नावालाही बँटरी शिल्लक राहणार नसल्याची निवडणूक काळात जाहीर सभेत मोठ्या राणाभिमदेवी थाटात बोलणाऱ्या विखे पिता - पुत्रांची वल्गना फेल ठरली आसून नगर जिल्ह्यात भाजपाच्या पराभूत उमेदवारांनी विखेंच्याच अंतर्गत कुरघोड्याच्या राजकारणातून आमचा पराभव केल्याचे विधानसभा निवडणूकीच्या राजकीय मैदानात कार्यकर्त्यांतून बोलले जात आसून विखेंमुळे पक्ष वाढला नाहीतर अस्थित्वच कमी झाल्याचे भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे.
  नेवाशात बाळासाहेब मुरकुटे,राहूरीत शिवाजी कर्डीले,कोपरगावांत स्नेहलता कोल्हे तर कर्जत - जामखेडमध्ये राम शिंदे यांचा पराभव झाला विखे पाटील भाजपात आल्याने पक्षाला बळकटी येईल असे वाटत होते विखे पिता - पुत्रांनी नगर जिल्ह्यात घडाळात बँटरी नावालाही शिल्लक राहणार नसल्याचे जाहीर सभेतून सांगितले मात्र गणितच उलट झाल्याने स्वपक्षातील विखे विरोधी गट तयार झाला आसून विखे - पाटलांविरुद्ध जिल्ह्याच्या राजकीय मैदानात नाराजीचा सुरु निर्माण झाला आसून सरकार बनले तर त्यांना मंत्रिमंडळात घेवू नये यासाठी विघ्नसंतोषी पराभूत आमदारांचे कटकारस्थान पडद्यामागून व्युहरचना आखतांना दिसत आसल्याचे बोलले जात आहे.
   नगर जिल्ह्यातील पराभूत आमदारांच्या कार्यकर्त्यांमधून विखे पाटलांमुळे आमचा राजकीय गेम झाल्याचे कार्यकर्ते उघडपणे बोलत सुटले आसून विखेंविरुद्ध कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. विखे पिता - पुत्रांना भाजपात घेवून नगर जिल्ह्यात कमळ पावर फुल्ल होण्याची दिव्यस्वप्न पहाण्याचा योगायोग जुळून न येता घड्याळ्याची बँटरीच पावरफुल्ल झाल्याने पक्षश्रेष्ठींनी काय बोध घ्यावा असा सुरुही निर्माण झाला आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget