नेवासा, प्रतिनिधी
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्यापालांनी खरिपासाठी प्रति हेक्टर आठ हजार व फळबागांसह बारमाही पिकांसाठी प्रति हेक्टर १८ हजार रुपये घोषणा करुन भरपाईसाठी दोन हेक्टरची कमाल मर्यादा ठेवल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आसल्याच्या प्रतिक्रीया शेतकऱ्यांनी घोषणा झाल्यानंतर तिव्रनाराजी व्यक्त करत प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे.
अवकाळी पावसाचा तडाख्याने बरबाद झालेल्या शेतकऱ्यांच्या मुलांचे शालेय शुल्क माफ करण्याचे गाजर दाखवत शेतकऱ्यांची क्रुरचेष्टा करुन बळीराजाचा अवमान केला आहे.या निर्णयाचा फेरविचार करुन संकटात सापडलेल्या बळीराजाला जीवदान देण्यासाठी भरीव मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.
राज्यपालांनी राज्यात अतिदृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईती घोषणा केली माञ ही मदत म्हणजे बळीराजाचा अपमान आसल्याच्या प्रतिक्रीया शेतकऱ्यांतून व्यक्त केल्या जात आसून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत देवून आधार द्यावा अशी मागणीही बळीराज्यातून होत आहे.

Post a Comment