भागवताचार्य महंत राधाकृष्ण महाराज यांची मुरमे(देवगड) येथील अखंड हरिनाम सप्ताहाला भेट

महंत राधाकृष्ण महाराजांनी गायलेल्या विठ्ठल.. माझा.. माझा.. .मी विठ्ठलाचा..या भजनाने भाविक तल्लीन

नेवासा, प्रतिनिधीराजस्थान जोधपूर येथील भागवताचार्य गोवत्स राधाकृष्ण महाराज यांनी सोमवारी दि.१८ नोव्हेंबर रोजी रात्री १० च्या सुमारास नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगडला व मुरमे गावात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह सोहळयाला भेट दिली.यावेळी विठ्ठल माझा माझा,मी विठ्ठलाचा या गायलेल्या भजनाने उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले या भजनाने भाविक तल्लीन झाले होते.यावेळी गोवत्स राधाकृष्ण महाराजांचे देवगड संस्थानच्या वतीने गुरुवर्य भास्करगिरी महाराजांनी यांनी स्वागत करून त्यांचा संतपूजन करून गौरव केला.यावेळी भागवताचार्य राधाकृष्ण महाराजांनी भगवान दत्तात्रयांसह श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.तसेच परिसराची ही पहाणी केली.दत्तजयंती सोहळया निमित्त होणाऱ्या कार्यक्रमाची ही त्यांनी माहिती घेतली.यानंतर त्यांनी देवगडच्या मुरमे गावामध्ये ग्रामस्थांच्या वतीने व गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या प्रेरणेने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह तपपूर्ती सोहळयाला भेट दिली व शुभेच्छा ही दिल्या.यावेळी सोहळा कमिटीच्या वतीने गोवत्स भागवताचार्य महंत राधाकृष्ण महाराज यांचे स्वागत व संतपूजन सरपंच अजय साबळे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी भाविकांना शुभाशीर्वाद देतांना गोवत्स महंत राधाकृष्ण महाराज म्हणाले की भगवंत हा भक्ताने केलेल्या भजनाने आनंदी होत असतो भगवंताला भेटायचे असेल तर त्याला विषय बनवा नक्कीच भेटेल,भगवंताचे सतत नाम हे ज्याच्या मुखात असते जो हरिनामाचा रस प्राशन करतो तोच खरा वैष्णव असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.मुरमे गावच्या अखंड हरिनाम सप्ताहानेबारा वर्षे म्हणजेच एक तप पूर्ण केल्याबद्दल त्यांनी हा सोहळा वर्षानुवर्षे वृद्धिंगत व वैभवशाली होत राहो, सर्वांच्या जीवनात भगवंत हाच विषय होत राहो अशा शुभेच्छा व शुभाशीर्वाद त्यांनी यावेळी बोलताना दिल्या.यावेळी हभप ऋषिकेश महाराज गोंधवणीकर, ह.भ.प.डॉ.वेणूनाथ महाराज वेताळ,माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे,तात्या महाराज शिंदे,राजेंद्र मते,नेवासा बुद्रुक येथील खंडोबा म्हाळसादेवी मंदिराचे व्यवस्थापक प्रा.डॉ.मुरलीधर कराळे,मुरमे देवगडचे सरपंच अजय साबळे,माजी सरपंच आप्पासाहेब वरखडे, रामकृष्ण मुरदरे,सुदाम चरवंडे, दादासाहेब साबळे, शंकर चरवंडे, वल्लभ वरखडे, दत्तात्रय वरखडे,सागर वरखडे, अर्जुन वरखडे,शरद पल्हारे,भिमाशंकर वरखडे,कल्याण वरखडे, काकासाहेब वरखडे, मारूती साबळे,अंबादास मुरदरे, गणेश मुरदरे,संदीप साबळे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.पत्रकार सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले तर सरपंच अजय साबळे यांनी उपस्थित भाविकांचे आभार मानले.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget