जलसंधारण विभागाचे जेसीबी आठ महिन्यापासून बंद...

गोदावरी उजव्या कालव्याचे नूतनीकरण थांबले

चांदेकसारे ( वार्ताहर) 
गेल्या आठ महिन्यापूर्वी गोदावरी कालव्याच्या नूतनीकरणाचा मोठा ओहापोह झाला होता .मात्र उन्हाळ्यात चालू झालेले काम जून महिन्यात पूर्णपणे बंद पडले. आठ महिन्यापासून बंद जलसंधारण विभागाचा जेसीबी बंद असून गोदावरी उजव्या कालव्याचे नूतनीकरण थांबले आहे. 
फेब्रुवारी 2019 या महिन्यात गोदावरी कालव्याचे नूतनीकरण करून पाण्याची होणारी गळती थांबवण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला .गोदावरी कालव्याच्या कडेला वाढलेल्या बाभळी ही काही ठिकाणी जलसंधारण विभागाच्या वतीने काढण्यात आल्या. याच काळात गोदावरी कालवा बचाव कृती समितीची स्थापना झाली. उन्हाळ्यात सुरू झालेले कालवा नूतनीकरणाचे काम पावसाळ्यात पूर्णपणे बंद पडले. जलसंधारण विभागाने सोनेवाडी परिसरातील कालव्याच्या कामासाठी आणून ठेवलेले जेसीबी मशीनही गेल्या आठ महिन्यापासून बंद आहे. गेल्या महिन्यात कालवा बंद झाला होता तेव्हा मात्र परत गोदावरी उजव्या कालव्याचे नूतनीकरणाचे काम सुरू होईल अशी अपेक्षा होती मात्र मशिनजागेवरूनच पुढे सरकले नसल्यामुळे गोदावरी उजव्या कालव्याचे नूतनीकरण पूर्ण थांबले आहे पाटबंधारे विभागाने याकडे गांभीर्याने पाहून सोनेवाडी परिसरातील कालव्यांच्या बाजूला वाढलेल्या काटेरी बाबळी काढाव्या अशी मागणी अहमदनगर जिल्हा सचिव संघटनेचे संघटक विठ्ठल जावळे यांनी केली आहे.
सोनेवाडी परिसरात ह्या गोदावरी उजव्या कालव्याच्या दोन्ही बाजूला काटेरी बाभळींनी वेढा दिला आहे त्यामुळे ओव्हरफ्लो चे आलेले पाणी आसपास असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये घुसले परिणामी आजपर्यंत ही या शेतकऱ्यांच्या गोदावरी कालव्या लगत असलेल्या जमिनी वाफसावर आलेल्या नाहीत.
पाण्याची गळती थांबविण्यासाठी कालव्याचे पूर्ववत काम पाटबंधारे विभागाने चालू करावे असेही जावळे यांनी सांगितले आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget