शाळकरी मुले करतात जीव मुठीत धरुन प्रवास
पाथर्डी- प्रतिनिधी । अमोल म्हस्के
पाथर्डी तालुक्यातील साकेगाव ते डांगेवाडी जुन्या रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी परीसरातील ग्रामस्थाकडून होत आहे.रस्त्यावरून शाळा,महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरुन चालावे लागते.कारण रस्त्यावर मोठेमोठे दगड तसेच पाण्यातून चिखल तुडावत पायी प्रवास करावा लागत आहे.या रस्त्याने दररोज ज्येष्ठ नागरिक, डॉक्टर,शिक्षक,शेतमजूर प्रवास करतात.काही वेळा लहान मुलांना प्रवास करताना इजा होत आहे.तसेच या रस्त्या खराब असल्याने मुले शाळेत जाण्यासाठी कंटाळा करत आहे.याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.परीसरातील नागरिक रस्त्याचे काम कधी सुरु होईल याची चिंता लागली आहे.शाळकरी मुलांच्या व ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने हा रस्ता होणे गरजेचे आहे.
आमची मुले शाळेत जाणार कशी?असा प्रश्न येथील पालकांना पडला आहे.रस्त्याचे कमीतकमी मजबुतीकरण होणे गरजेचे आहे.तसेच रस्त्यावर आवश्यक ठिकाणी पुलाचे काम होणे गरजेचे आहे.कारण पावसाळ्याच्या दिवसात येथील नागरिकांना रस्त्यावरून जाताना मोठी कसरत करावी लागते

Post a Comment