भीषण अपघातात दोघे ठार

विसापूर
सोमवार दि.25 रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास नगर-दौंड रोडवर श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव शिवारत   माेटारसायकल व इंडिका कार यांचा अपघात झाला.या मध्ये मोटार सायकल वरील दोघे ठार झाले.ते दोघे ऊसतोडणी मुकादम होते. दादा दगडू राठोड वय २६ उमरखेड ता.कन्नड जि.औरंगाबाद व एकनाथ वामन चव्हाण वय ३१ उमरखेड ता.कन्नड जि.औरंगाबाद हे जखमी होऊन मयत झाले आहेत.तर इंडिका कारचा चालक नितीन सूर्यवंशी,रा.चांदा बु.ता.कर्जत हा जखमी झाला आहे. मृतदेहांचे पोस्ट मार्टम साठी ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदा येथे पाठविण्यात आले. जखमी देखील श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालय येथे उपचार घेत आहे. बेलवंडी पोलीसांनी कायदेशीर कारवाई केली.पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी घटना स्थळी भेट देऊन माहिती घेतली.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget