चांदेकसारे ( वार्ताहर)
उन, वारा,पाऊस,थंडी,बर्फ कशाचीच तमा न बाळगता आपल्या देशाचे वीर जवान देशाचं संरक्षण करण्यासाठी सिमेवर कडा पहारा देतात . परकीय आक्रमणापासून देश वाचविण्यासाठी प्राणाची पर्वा न करता हुतात्मा होतात.त्यांच्या कार्याची दखल सर्वांनी घेतली पाहिजे.त्यासाठी सैनिक कल्याण निधी आपला सहभाग दिला पाहिजे कारण सिमेवर संरक्षण करणाऱ्या सैनिकांमुळेच आपण व आपला देश सुरक्षित आहे असे प्रतिपादन पोहेगांवचे सरपंच अमोल औताडे यांनी केले.
ते कोपरगाव तालुक्यातील पोहेगांव येथे सैनिक कल्याण निधी संकलन कार्यक्रमात बोलत होते.
शिवसेना नेते नितिनराव औताडे यांनी हस्ते सैनिक कल्याण निधी बाँक्स मध्ये सहभाग टाकून सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भगिरथ रोहमारे ह़ोते.
यावेळी माजी अध्यक्ष रियाज शेख, बाबासाहेब रोहमारे, ग्राम विकास अधिकारी रामदास काळे, आप्पासाहेब पानगव्हाणे, मुख्याध्यापिका कमल नलगे, राजश्री डोंगरे,शिक्षक सुभाष गरुड, दिपक झावरे, बाळासाहेब गोरे , शिक्षिका प्रतिभा राऊत, अनिता हरदास,निलोफर शेख, श्रीमती शेंडे,श्रीमती बोरशे,श्रीमती सोनवणे अदिसह विद्यार्थी उपस्थित होते.पहीली ते चौथी पर्यंत असलेल्या पोहेगांव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले/मुली येथील चिमुकल्या नी गावात फेरी काढून निधी संकलन केले.
भारतीय संविधान दिन हा कार्यक्रम झाल्यानंतर सरपंच अमोल औताडे यांच्या हस्ते निधी संकलन बाँक्स मधील निधीची मोजणी केली.विद्यार्थानी जमा केलेला निधी रुपये ३६०० केंद्रप्रमुख राजेंद्र ढेपले यांच्या कडे सुपुर्द करण्यात आला.जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या कडून ही रक्कम सैनिक कल्याण निधीत जमा होणार आहे.

Post a Comment